पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकऱ्याची व्यथा

ती रात्र खूपच भयाण वाटत होती.त्यातच अधून-मधून येणारा रातकिड्यांचा आवाज,झाडांवरील सळसळणाऱ्या पानांचा आवाज त्या रात्रीची भयाणता अजूनच वाढवत होता.रामूला काही केल्या झोपच लागत नव्हती.ह्या कुशीवरून त्या कुशीवर असा त्याचा झोपण्यासाठीचा प्रयत्न चालूच होता.घराच्या छपराकडे बघत त्याच्या मनात विचार चालूच होते.जणू काही विचारांनी त्याच्या मनात कायमचा मुक्कामच केला होता.उद्याच्या दिवसाची चिंता त्याला भेडसावत होती ती म्हणजे आपले पिक ज्यासाठी इतकी मेहनत घेतली ते व्यवस्थित होईल की नाही?आणि व्यवस्थित झाले तर भाव हवा तसा मिळेल की नाही?निदान उद्या तरी कर्जमाफी बद्दल काहीतरी बातमी कळेल की नाही?पिकातून हवा तसा मोबदला मिळाला तर बायको आणि मुलांसाठी काहीतरी करण्याची त्याची इच्छा होती ती पूर्ण होईल का?दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च भागेल ना?अशा कित्येक प्रश्नांनी त्याच्या मनात थैमान घातल होत.अखेर कित्येक वेळाने आणि अथक प्रयत्नांनंतर रामूचा आणि झोपेचा मेळ साधला गेला आणि तो झोपी गेला.दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग आली ती कोण तरी घराच्या दारावर येऊन काहीतरी सांगत आहे आणि त्यातील काही शब्द त्याच्या कानावर पडले.ते ...

आनंदी गोपाळ...... एक उत्तम चित्रपट

आज एका महत्वाच्या विषयावर ह्या लेख मार्फत मी बोलणार आहे.महत्वाचा विषय ह्यासाठी म्हंटले कारण आजकाल महिलांवर,मुलींवर अत्याचार होतायत तर त्या दृष्टीने हा विषय महत्वाचाच आहे.खूप दिवस एक चित्रपट प्रदर्शित होणार म्हणून सगळीकडेच चर्चा चालू होती तो म्हणजे आनंदी गोपाळ.मी सुद्धा जेव्हा ह्या चित्रपटाची झलक बघितली होती तेव्हापासून मी सुद्धा खूपच उत्सुक होते आणि ठरवलं की पहिल्याच दिवशी हा चित्रपट बघायचा.माझ्याप्रमाणे घरातील सुद्धा सर्वजण उत्सुक असल्या कारणाने आम्ही पहिल्याच दिवसाची तिकीट काढली.अखेर उत्सुकता संपली आणि तो दिवस उजाडला आणि आम्ही ठरल्याप्रमाणे चित्रपट बघण्यासाठी निघालो.घरापासून ते  चित्रपटगृह ह्या ठिकाणापर्यंतच्या त्या पाच मिनिटांच्या प्रवासात मनात विचार चालूच होते चित्रपटाबद्दल.असो तर अखेर चित्रपटगृहापाशी आम्ही पोहोचलो आणि मी तिथेच माझ्या मनातील विचारांना पूर्णविराम दिला.आणि अखेर चित्रपट सुरु झाला.चित्रपट सुरु असताना टिपण्याच्या गोष्टी म्हणजे छोट्या आनंदीबाईंचा निरागसपणा,पण त्या निरागसपणा मध्ये सुद्धा असणारी एक समजुतीची भावना,जेवढ्या आनंदीबाई निरागस,तितकेच कठोर आणि स्पष्ट बोलणारे...