पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजच्या काळाची गरज -गडसरंक्षण

आज खूप महत्वाच्या विषयाला हात घालणार आहे.आपलं जे अफाट मराठी साम्राज्य आहे ते उभे करायला आपल्याला खूप शूर व्यक्ती लाभल्या.त्यामधीलच व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.आजही त्यांचे नाव ऐकले की,डोळ्यांसमोर एक शूर,बेधडक अशी प्रतिकृती तयार होते.लहान असताना शालेय जीवनात इतिहासात खूप शिवाजी महाराजांबद्दल वाचल होत,त्यांचे ते कार्य,मराठी साम्राज्यासाठी केलीली अफाट मेहनत,शिवाजीराजांचे मावळे,गड जिंकण्यासाठीचे अथक प्रयत्न,सगळं काही ऐकलं होत.परंतु पुढे जाऊन हे फक्त अभ्यासापुरतं मर्यादित राहील अस वाटलं होत.कधी प्रत्यक्ष जीवनात गड-किल्ल्यांचा अनुभव घ्यायला मिळेल वाटलं नव्हत.ट्रेकिंग,गडभ्रमंती विषयी खूप ऐकलं होत खरं तर.आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टी विषयी ऐकतो तर आपल्याला लगेच उत्सुकता निर्माण होतेच.तेव्हा ठरवलं आपण ही तो अनुभव घ्यायचा.आणि तो दिवस  उजाडलाच जेव्हा गडभ्रमंती करण्याची संधी मिळाली.आपण जर पहिल्यांदा एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणार असू तर आपण  थोडे का होईना उत्सुक असतोच.तशीच मी ही उत्सुक होते.आतापर्यंत मी तीन गडभ्रमंती केल्या आहेत.तिन्ही गडभ्रमंतीचा अनुभव इतका अफाट आणि अविस्मरणीय...

दिवाळी.....आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा सण

दिवाळीचा सण........ह्या सणाबद्दल दरवर्षीच खूप उत्सुकता असते.जसे गणपतीच्या सणाला सगळे उत्सुक असतात अगदी तसेच प्रत्येकजण ह्या सणाला सुद्धा उत्सुक असतात.गणपती बाप्पा जसे आनंद घेऊन घरात येतात,सर्वांना एकत्र आणतात अगदी तसच हा सण सुद्धा प्रत्येकाच्या घरात आनंद आणतो,भरभराट आणतो.दिवाळीशी माझ्या  खूप काही आठवणी जोडलेल्या आहेत त्याच सर्व मी ह्यामध्ये लिहिणार आहे.तुम्ही सर्वजण सुद्धा नक्की त्या आठवणींमध्ये स्वतःला कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न कराल.माझ्या मते, सर्वात जास्त दिवाळीची उत्सुकता असते ती म्हणजे बालपणीच.बालपणी जो दिवाळीचा मनमुराद आनंद लुटता येतो तो कुठेच मिळू शकत नाही.माझं बालपण गेलं ते म्हणजे पोलीस वसाहतीत.आमच्या इमारतीत एका माळ्यावर बारा खोल्या होत्या.त्याठिकाणी फराळ करण्यात तर एक वेगळीच मजा असायची.मोठी माणस फराळ करायची आणि आम्ही फक्त बसून त्या क्षणांची मजा घ्यायचो.खरंच त्या दिवसांची मजाच काही वेगळी होती.आता लिहिताना सुद्धा ते दिवस डोळ्यासमोरून गेले.दिवाळी म्हणजे फराळ तर असतोच पण अजून काही गोष्टी म्हणजे दिवाळीची खरेदी,फटाके,रांगोळी,कंदील,पणत्या.बालपणी ते आई-वडिलांचा हात धरून खरेदीला...

किल्ला राजगड......खूप अविस्मरणीय गडभ्रमंती

किल्ला राजगड.......ही माझी आतापर्यंतची तिसरी गडभ्रमंती.आधीच्या दोन्ही गडभ्रमंतीप्रमाणे ही गडभ्रमंती सुद्धा तितकीच खूप रोमांचक,खूप मनाला आनंद देणारी होती.पण हा गड फिरून हे मला नक्कीच कळलं की,हे जे सर्व गड आहेत ते म्हणजे आपल्या सर्वांना लाभलेली एक सुंदर अशी भेटवस्तू आहे.मी जो राजगड वर अनुभव घेतला तोच मी माझ्या शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतेय.राजगड ला जाण्यासाठी आम्ही नेहमीप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी एकत्र जमलो.त्यानंतर सगळे सामान एकत्र ठेऊन आमचा राजगडच्या दिशेने प्रवास सुरु झाला.प्रवास जसा सुरु झाला तसा मनातून खूप आनंद होत होता की कधी एकदा त्या ठिकाणी पोहोचतेय.खरं तर का कोण जाणे पण राजगडच्या बाबतीत मी खूपच उत्सुक होते.खरं तर प्रवास जेव्हा सुरु झाला तेव्हाच मी राजगडपाशी पोहोचले होते फक्त शरीराने पोहोचण्याची बाकी होते.प्रवासात नेहमीप्रमाणे सगळ्यांची मजा-मस्ती चालू होती,गप्पा-गोष्टी चालू होत्या,गाणी चालू होती.थोड्यावेळाने मग गाडीमध्ये संपूर्ण शांतता पसरली कारण सगळेच झोपी गेले.जशी मी उत्सुक होते ह्या गडभ्रमंतीसाठी अगदी तसेच प्रत्येकजण उत्सुक होते.शेवटी ती उत्सुकता संपली आणि आम्ही पहाटे ...

नवरात्र..स्त्रीशक्ती दिवस

नवरात्र..स्त्रीशक्ती दिवस....... हे नऊ दिवस म्हणजे स्त्रीकडे सर्वजण आदराने,अभिमानाने बघतात.एक प्रकारे दुर्गामातेचं आगमन होत.हे नऊ दिवस स्त्रिया रोजच्या कामाच्या व्यापातून थोडावेळ आपल्यासाठी काढतात.थोडावेळ का होईना पण आनंदाने छान नटून थटून,हास्यमुखाने,आनंदाने ते नऊ दिवस साजरे करतात.प्रत्येक स्त्रीकडे,मुलीकडे एक वेगळीच शक्ती आहे.दुर्गामातेचा आशीर्वादच जणू नेहमी प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी आहे असे वाटते. दुर्गामातेकडे जी शक्ती आहे तीच शक्ती दुर्गामातेने प्रत्येक स्त्रीला दिली आहे.आजकाल स्त्रिया प्रत्येक जबाबदारी सांभाळून वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपल नाव मोठं करतायत.खरंच खूप अभिमान वाटतो स्त्रियांचा.घरची जबाबदारी तर चोखपणे पार पाडतातच पण अगदी तसेच बाहेरील जबाबदारी ही त्या चोखपणे पार पाडतात.प्रत्येक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवतात.पण आजही विविध बातम्या ऐकून,वर्तमानपत्र वाचून मनात एक विचार सारखा घर करून जातो,तो म्हणजे खरंच आजकाल स्त्री सुरक्षित आहे का?,ती स्वतःचे निर्णय ठामपणे घेऊ शकते का?तिच्यावर हुंडा न दिल्यामुळे होणारे अत्याचार थांबतील का?असे किती तरी प्रश्न उभे राहतात.अगदी ...

बाप्पा......ओढ तुझ्या आगमनाची

सप्टेंबर महिना सुरु झाला की,सगळे फक्त एकाच ठिकाणी आपले लक्ष लावून असतात बाप्पा कधी येणार आपल्या भेटीला? कधी एकदा आपल्या घरी बाप्पा विराजमान होणार? सगळे अगदी आस लावून बसलेले असतात बाप्पा तुझ्यासाठी.बाप्पा तू सुद्धा नक्कीच आम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी उत्सुक असशील ना?खरं तर हा प्रश्न तुला विचारण चुकीच आहे कारण,तू तर नेहमी आमच्याबरोबर असतोच.प्रत्येक दुःखात-संकटात आमची साथ देतोस तू.जसा एक आपला जिवलग मित्र ,आपले आई बाबा कितीही कठीण प्रसंग आला तरी आपली नेहमीच साथ देतात,आपल्याला एकट सोडत नाहीत अगदी तू ही तसाच नेहमी बरोबर असतोस.पण बाप्पा मला कधी-कधी एक प्रश्न पडतो की,तू इतक्या लोकांचं दुःख दूर करतोस मग तुला दुःख नसेल का कोणत्या ही गोष्टीच,तुझी साथ कोण देत असेल?पण बाप्पा खरंच तुझे खूप मनापासून आभार.तुझे आभार जितके मानावे तितके कमीच आहेत.आज ह्या लेखनाच्या निमित्ताने मला अस वाटतंय की,बाप्पा तू माझ्यासमोरच बसला आहेस आणि मी तुझ्याशी गप्पा मारतेय.माझ्या प्रमाणे अनेक भक्तजन,तुझे चाहते तुझी खूप आतुरतेने वाट बघतायत.अगदी लहान मुले,तरुण मुलं,मोठी माणसं,वयस्कर माणसं सगळेच तुझ्या दर्शनासाठी उत्सुक आहेत.स...

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास

इमेज
सुधागड किल्ला......ही माझी दुसरी गडभ्रमंती. पहिल्या गडभ्रमंतीसाठी जशी उत्सुक होते, तशीच किंवा त्याहीपेक्षा जास्त ह्या गडभ्रमंतीसाठी खूपच उत्सुक होते.पावसाळा हा माझा आवडता ऋतू असल्यामुळे पावसातील गडभ्रमंती करण्यास मिळणार म्हणून खूप खूष होते. निसर्ग सौंदर्याचा जवळून आस्वाद घेणार होते. खूप उत्सुकतेने त्या दिवसाची वाट पाहत होते. अखेर तो दिवस उजाडला आणि ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी एकत्र भेटलो. त्यानंतर मग आमचा सुधागडच्या दिशेने प्रवास सुरु झाला.मनाला एक वेगळाच असा आनंद होत होता.त्या ठिकाणी पोहोचण्याची खूप उत्सुकता लागून राहिली होती.थोड्यावेळाच्या प्रवासानंतर एका ठिकाणी सकाळची न्याहारी करण्यासाठी थांबलो. त्या ठिकाणी मस्त गरमागरम वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतला आणि मग पुढच्या प्रवासाला रवाना झालो.त्यानंतर गाडीत गप्पा, मजा-मस्ती करत थोड्यावेळाने गडाच्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही त्याठिकाणी पोहोचलो आणि पाऊस सुरू झाला म्हणून प्रत्येकाने आपापले रेनकोट घातले. त्यानंतर मग ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने आपली ओळख करुन दिली आणि गडाबद्दल थोडक्यात माहिती घेऊन गड चढण्याच्या दिशेने रवाना झालो. गड चढताना पाऊस...

🙏१५ ऑगस्ट,स्वातंत्र्य दिन,आपल्या सुंदर भारत देशाचा दिवस 🙏

१५ ऑगस्ट,स्वातंत्र्य दिन,आपल्या सुंदर भारत देशाचा दिवस.आज खूप ठिकाणी देशभक्ती ची गाणी कानावर पडली.सर्वजण एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात.शाळेत सुद्धा आजचा दिवस खूप सुंदर पद्धतीने साजरा केला जातो.ध्वजारोहण,राष्ट्रीय गीत,आपली प्रतिज्ञा म्हणून साजरा केला जातो.लहान मुले सुद्धा किती आनंदाने ह्यामध्ये सहभागी होतात ना.त्यांच्या डोळ्यातले ते देशप्रेम पाहून खरंच मनाला खूप आनंद होतो.खरंच लहान मुले खूप नशीबवान आहेत असे मला वाटते.परत एकदा कधी रोज राष्ट्रीय गीत  म्हणायला मिळेल हा प्रश्न पडतो.आजकाल राष्ट्रीय गीत कुठून रस्त्यावरून जाताना त्या ठिकाणी जर शाळा असेल तर ऐकायला मिळते किंवा एखादा कोणता चित्रपट बघायला गेलेले असू,तर त्या ठिकाणी चित्रपट सुरु होण्याआधी ऐकायला मिळते.आपल्या तरुण पिढीच्या सुद्धा स्वातंत्र्य दिनाबद्दल शाळेशी जोडलेल्या खरंच खूप छान,अविस्मरणीय आठवणी असतील.सकाळी लवकर उठून तयारी करून शाळेत जाणे,नंतर एकत्र जमणे आणि एका रांगेत उभे राहून प्रथम ध्वजारोहण,नंतर राष्ट्रीय गीत,नंतर प्रतिज्ञा बोलणे,आणि नंतर मग भाषण आणि शाळेत दिलेला पेढा. खरंच ह्या आठवणी खूप सुंदर आहेत.आज ह्या स्वातंत्र्य द...

आई

आई....या शब्दामध्ये आपल पूर्ण जग सामावल आहे.आई म्हणजे आपल्यासाठी नेहमी दिवसभर झटत राहणारी व्यक्ती.स्वतःपेक्षा नेहमी फक्त आणि फक्त ती आपलाच विचार करत असते.नेहमी आपल्या सुखाचा विचार करत असते.तिला कितीही दुःख,अडचणी असूदेत,पण आपल्याला आनंदी  बघितल की तिच दुःख ती कुठच्या कुठे विसरून जाते.आई म्हणजे मायेचा ओलावा,एक अशी मायेची ऊब ज्यामुळे आपल्याला खूप धीर मिळतो.आपल्याला आयुष्यात पुढे जाऊन सगळे काही मिळावे,आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते.बालपणी सुद्धा आपण घाबरलेले असलो  तर तिच्या कुशीत बसून राहण्यास एक वेगळाच आनंद वाटायचा .हे असे लिहिताना नकळत बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या.असे वाटते आपले ते दिवस परत आले तर किती बरे होईल ना.     आपण जसे मोठे होत जातो. आपल्या वागण्यात बदल होत असेल पण आई ही तशीच असते.नेहमी आपली काळजी करणारी,आपल्याला जपणारी.आपण शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीला लागतो आणि थोड्या का होईना पण तिच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.आपल्या पगारातून तिच्यासाठी आणलेली वस्तू पाहून ती किती खुश होते.तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच ...

बाबा

बाबा....आयुष्यातली खूप महत्वाची आणि ज्या व्यक्तीची तुलना कोणाशीच करू शकत नाही.जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपले बाबा किती खूष होतात ना. आपण जेव्हा जन्म घेतो आणि बाबा आपल्याला त्यांच्या मिठीत घेतात तेव्हाचा तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला बघायला मिळाला असता तर? खरंच देवाने अस काहीतरी करायला हवं होत.पण देवाला सुद्धा दोष देऊन चालणार नाही कारण त्याने बाकी काही आपल्याला देण्यापेक्षा इतके सुंदर बाबा आपल्याला दिलेच आहेत ना हे विसरून चालणार नाही. मला असा वाटतं की, आपला जन्म होताच देवाने बाबा म्हणजे आपल्याला दिलेले एक बक्षीसच आहे. अजूनही त्या बालपणीच्या आठवणी खूप काही देऊन जातात,चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणि थोडं रडू सुद्धा येत. खरंच सगळं काही विसरून किती काळजी करतात ना आपली.आपण जेव्हा लहानपणी चालायला बघत असतो तेव्हा आपला कुठे तोल जाऊ नये,आपण पडू नये,म्हणून आपल्या पाठूनच फिरत असतात.चालताना त्यांचे ते बोट धरून चालणे खरंच खूप छान वाटायचे.जेव्हा आपण पहिल्यांदा बाबा बोलतो तेव्हा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद या सगळ्याचे वर्णन जितके करावे तितके कमीच आहे.शाळेत जाताना त्यांचा तो हात ...
इमेज
वडापाव-चविष्ट आणि सगळ्यांनाच आनंद देणारा पदार्थ वडापाव हा शब्द कानावर जरी पडला तरी प्रत्येक जण किती खूष होतो ना.खरंच वडापाव आहेच तसा.खूप आधीपासूनच प्रत्येकालाच वडापाव आधार देत आला आहे असे मला वाटते.सकाळी जेव्हा चाकरमानी आपल्या कामासाठी निघतो तेव्हा हा वडापावच त्यांच्या पोटाला आधार देतो आणि मनाला एक प्रकारचा आनंद देतो.प्रत्येकालाच  वडापावचे वेड आहे अस मला वाटते.अगदी लहान मुलं,मोठी माणसं,वयस्कर माणसं सुद्धा वडापाव साठी वेडे आहेत.आपल्या आयुष्यात जशी काही माणसं आपल्याला नेहमी आधार देण्यास तयार असतात,अगदी तसच वडापाव सुद्धा प्रत्येकाला नेहमीच आनंद देण्यास ,आधार देण्यास तयार असतो.रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हा वडापावच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणतो.वडापाव पावसाळ्यात तर सगळ्यांना आपला जिव्हाळ्याचा मित्रच वाटत असेल.पावसात छान भिजलेले असताना मस्त गरम गरम वडापाव खाण्यात एक वेगळाच आनंद आहे आणि त्याबरोबर चहा असेल तर दुग्ध शर्करा योगच.हा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात नक्कीच घेतला असेल.वडापाव खर तर आपल्या प्रत्येकाला लाभलेली एक देणगीच आहे असे म्हंटलेे तरी चालेल.मी खू...

नोकरी आणि प्रवास

नोकरी.....आजकालच्या जगात प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक अविभाज्य भाग, जगण्याचा एक मार्ग. माणूस नोकरी मध्ये आज काल इतका व्यस्त झाला आहे की त्याचे स्वतःकडे लक्ष आहे की नाही याचाच प्रश्न पडतो.पण तरीसुद्धा मला असे वाटते की माणूस नोकरी मध्ये व्यस्त जरी झाला असेल तरी तो समाधानी आहे.कारण तो इतका कामात व्यस्त असला तरी,नोकरी साठी रोज धावपळ जरी करत असला तरी त्याची ही धावपळ तो त्याच्या आयुष्यातल्या प्रिय व्यक्तींसाठी,त्यांच्या आनंदासाठी करत असतो.सकाळच्या ठोक्यावर त्याचा प्रवास चालू होतो. लोकल हा प्रत्येक नोकरी करणाऱ्या माणसाच्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे असे म्हंटले तरी चालेल.माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्याचे काम ही एकमेव लोकल करते.मी सुद्धा माणसांची ती लोकल मध्ये चढण्यासाठी ची धावपळ,लोकल मध्ये दुसऱ्या व्यक्ती ला हात देऊन केलेली मदत,सगळं काही अनुभवलंय.शेवटी प्रत्येकालाच आपल्या ठिकाणी वेळेवर पोहचायचे आहे, ही गोष्ट तो लोकल मध्ये प्रवास करणारा प्रत्येक व्यक्ती जाणतच असतो.तो जो लोकल मधला अर्ध्या-पाऊण तासाचा प्रवासच प्रत्येकाला थोडा वेळ का होईना पण एक वेगळाच आनंद देतो.कोणी एकमेकांशी गप्पा म...

तो पाऊस आणि त्या गोड आठवणी

⛆⛆पाऊस⛆⛆.....हा शब्द कानावर पडला की मनाला खरंच खूप आनंद मिळतो.पाऊस हा एक जिवलग मित्र आहे असे म्हंटले तरी चालेल.आपला जिवलग मित्र जस आपल बोलणं काहीही तक्रार न करता खूप वेळ ऐकून घेतो अगदी तसच हा पाऊस सुद्धा आपल्या मनातले सगळे काही ऐकून घेतोय असेच वाटते.माझ्या मते,पाऊस हा प्रत्येकालाच आनंद देणारा असतो.जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पक्ष्यांचा आवाज कानावर पडला की असे वाटते की,ते सुद्धा आनंदाने गाणे गाउन आपला आनंद व्यक्त करतायत.हवेने डोलणारी झाडे-झुडपे पण बघितली की,असे वाटते की ती झाडे सुद्धा आनंदाने पावसाच्या त्या आवाजावर नृत्य सादर करतायत.पाऊस निसर्गाला सुद्धा त्याच्यात सामावून घेतो जसे की आई आपल्या बाळाला कुशीत सामावून घेते. पावसात भिजण्याचा सुद्धा एक वेगळाच आनंद असतो.पावसाचे ते थेंब हातावर झेलने,डोळे मिटून पावसाखाली उभे राहणे,त्यातच छान असा सुटणारा गार वारा,ढगांचा गडगडाट,चमकणारी वीज,मातीचा तो छान असा मनाला प्रसन्न करणारा सुगंध. खरंच पावसाबद्दल जितक बोलाव तितक कमीच आहे.पावसासोबतच्या बालपणीच्या आठवणी सुद्धा खूप आहेत.मनसोक्त पावसात भिजणं,साचलेल्या पाण्यात उड्या मारण,कागदाच्या बोटी कर...