पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किल्ला राजगड......खूप अविस्मरणीय गडभ्रमंती

किल्ला राजगड.......ही माझी आतापर्यंतची तिसरी गडभ्रमंती.आधीच्या दोन्ही गडभ्रमंतीप्रमाणे ही गडभ्रमंती सुद्धा तितकीच खूप रोमांचक,खूप मनाला आनंद देणारी होती.पण हा गड फिरून हे मला नक्कीच कळलं की,हे जे सर्व गड आहेत ते म्हणजे आपल्या सर्वांना लाभलेली एक सुंदर अशी भेटवस्तू आहे.मी जो राजगड वर अनुभव घेतला तोच मी माझ्या शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतेय.राजगड ला जाण्यासाठी आम्ही नेहमीप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी एकत्र जमलो.त्यानंतर सगळे सामान एकत्र ठेऊन आमचा राजगडच्या दिशेने प्रवास सुरु झाला.प्रवास जसा सुरु झाला तसा मनातून खूप आनंद होत होता की कधी एकदा त्या ठिकाणी पोहोचतेय.खरं तर का कोण जाणे पण राजगडच्या बाबतीत मी खूपच उत्सुक होते.खरं तर प्रवास जेव्हा सुरु झाला तेव्हाच मी राजगडपाशी पोहोचले होते फक्त शरीराने पोहोचण्याची बाकी होते.प्रवासात नेहमीप्रमाणे सगळ्यांची मजा-मस्ती चालू होती,गप्पा-गोष्टी चालू होत्या,गाणी चालू होती.थोड्यावेळाने मग गाडीमध्ये संपूर्ण शांतता पसरली कारण सगळेच झोपी गेले.जशी मी उत्सुक होते ह्या गडभ्रमंतीसाठी अगदी तसेच प्रत्येकजण उत्सुक होते.शेवटी ती उत्सुकता संपली आणि आम्ही पहाटे ...

नवरात्र..स्त्रीशक्ती दिवस

नवरात्र..स्त्रीशक्ती दिवस....... हे नऊ दिवस म्हणजे स्त्रीकडे सर्वजण आदराने,अभिमानाने बघतात.एक प्रकारे दुर्गामातेचं आगमन होत.हे नऊ दिवस स्त्रिया रोजच्या कामाच्या व्यापातून थोडावेळ आपल्यासाठी काढतात.थोडावेळ का होईना पण आनंदाने छान नटून थटून,हास्यमुखाने,आनंदाने ते नऊ दिवस साजरे करतात.प्रत्येक स्त्रीकडे,मुलीकडे एक वेगळीच शक्ती आहे.दुर्गामातेचा आशीर्वादच जणू नेहमी प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी आहे असे वाटते. दुर्गामातेकडे जी शक्ती आहे तीच शक्ती दुर्गामातेने प्रत्येक स्त्रीला दिली आहे.आजकाल स्त्रिया प्रत्येक जबाबदारी सांभाळून वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपल नाव मोठं करतायत.खरंच खूप अभिमान वाटतो स्त्रियांचा.घरची जबाबदारी तर चोखपणे पार पाडतातच पण अगदी तसेच बाहेरील जबाबदारी ही त्या चोखपणे पार पाडतात.प्रत्येक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवतात.पण आजही विविध बातम्या ऐकून,वर्तमानपत्र वाचून मनात एक विचार सारखा घर करून जातो,तो म्हणजे खरंच आजकाल स्त्री सुरक्षित आहे का?,ती स्वतःचे निर्णय ठामपणे घेऊ शकते का?तिच्यावर हुंडा न दिल्यामुळे होणारे अत्याचार थांबतील का?असे किती तरी प्रश्न उभे राहतात.अगदी ...